Diamond Publications
शेतक-यांच्या आत्मह्त्या थांबवायच्या कशा?
शेतक-यांच्या आत्मह्त्या थांबवायच्या कशा?
शेतकर्यांच्या आत्महत्या बंद होऊन शेती व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी सरकारी धोरणात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मोफत वीज, कर्जमाफी, रासायनिक खतांसाठी सबसिडी वगैरेतून शेतकर्यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारणे अशक्य! सरकारवर विसंबून न राहता तरुण शेतकर्यांनी स्वत:च्या शेतमाल-प्रक्रिया स्थापन करून,
अ-राजकीय पातळीवर गावोगावी चर्चा-गट स्थापून, आपल्या उत्पन्नात अनेक प्रकारे वाढ करण्याची गरज आहे. सरकारने
गेल्या ६० वर्षांत काहीच न दिल्याने आता तरुण शेतकर्यांनी
स्व-प्रयत्नांनी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
शेतकर्यांचे नेते, सामाजिक व राजकीय पुढारी तसेच सरकारी यंत्रणेने शेतकर्यांचे मुख्य प्रश्न समजून घेण्यासाठी व वाढत्या आत्महत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
