Skip to product information
1 of 1

Diamond Publications

मराठ्यांच्या इतिहासातील चिमजिअप्पन्चे योगदान

मराठ्यांच्या इतिहासातील चिमजिअप्पन्चे योगदान

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out

‘चिमाजी आप्पा’ म्हटले की, वसईची लढाई हे सर्वसामान्यांना आणि अभ्यासकांनाही ठाऊक आहे. मराठ्यांचा हा विजय भारतीय इतिहासातील एक ‘गौरवशाली प्रकरण’ आहे. या मोहिमेमुळे चिमाजी राष्ट्रीय वीर पुरुष ठरले. वसईचा विजय हा त्यांच्या कल्पक व धाडसी नेतृत्वाचा परिणाम होता. ते एक पराक्रमी लढवय्ये तसेच मुत्सद्दीही होते. पेशव्यांच्या कौटुंबिक तसेच आर्थिक जबाबदार्‍या अतिशय बारकाईने आणि प्रामाणिकपणे पार पाडणारे कुटुंबवत्सल माणूस होते. धीरोदात्तपणा, नम्रता, सत्शील चारित्र्य, मनमिळाऊपणा इत्यादी विशेष गुण त्यांच्या ठायी होते. अठराव्या शतकाचा विचार करता, त्या काळातील ते एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते.
अशा या आगळ्यावेगळ्या माणसाच्या आयुष्याचा पट अनेक प्रकाशित, अस्सल आणि काही अप्रकाशित, मूळ संदर्भसाधनांच्या साहाय्याने उलगडण्याचा केलेला हा एक प्रयत्न !

View full details